pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजकीय इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य !

0 1 7 6 7 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

सेक्टर १७ उलवे नोड – शेलघर – खारकोपर रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता एका बाजूने गेली १२ वर्षे, रस्त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे एक घर असल्यामुळे रहदारीसाठी बंद होता. सिडकोच्या माध्यमातून अनेक वर्षे पाठपुरावा करून सुद्धा यश येत नव्हते, कारण सिडको व्यवस्थापन प्रकल्पग्रस्तांच्या घराचे पुनर्वसन करायला तयार नव्हते. शेवटी प्रकल्पग्रस्तांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या जनता दरबारात हजेरी लावली व आपले गाऱ्हाणे सांगितले. महेंद्र घरत यांनी सिडकोचे मुख्य अभियंता व इतर अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. सिडको अधिकाऱ्यांनी घरांचे पुनर्वसन संदर्भात असमर्थता व्यक्त केली श्री. प्रकाश जो. भगत व त्यांच्या पत्नीने हे घर काढल्यास आम्ही बेघर होणार, सिडको अतिक्रमण पथक तर जेसीबी घेऊन वारंवार धमक्या देत होते.

एक मार्गिका बंद असल्यामुळे बसेस, डंपर, अवजड वाहतूक व हलकी वाहने यांचे खारकोपर रेल्वे स्टेशन मार्गीकेवरील वाहतूक कोंडी, होणारे अपघात टाळण्यासाठी महेंद्र घरत यांनी प्रकल्पग्रस्ताला स्वखर्चाने मातोश्री यमुनाबाई ट्रस्टच्या माध्यमातून १५ लाख रुपये खर्च करून घर बांधून दिले. प्रथम प्रकाश जो. भगत यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन केले व त्या एकतर्फी मार्गातील प्रकल्पग्रस्तांचे बांधकाम काढण्यासाठी सिडको व्यवस्थापनाला मदत केली. यामुळे गेल्या १२ वर्षांपासून उलवे वासियांना वाहतूक कोंडीचा, अपघाताचा सामना करावा लागु नये त्यातून मार्ग काढून उलवे वासिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती, लोकसेवकांचे, नेत्यांचे काम नागरिकांचे जीवन सुरळीत व्हावे म्हणून तन – मन – धनाने काम जर सर्व नेत्यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रमाणे केले तर समाजातील लोकांना राजकीय नेत्यांबद्दल निश्चितच आपुलकी वाटेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे