सोयाबीनला अल्प भावामुळे यंदा कपाशी 10 हजार हेक्टरने वाढणार

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.8
शेतकऱ्याकडून खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून कृषी मालाला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. मात्र जिल्ह्यात पिक बदलाचा कोणताही सक्षम पर्याय शेतकऱ्यांसमोर सद्या नाही. जिल्ह्यात सोयाबिन व कपाशी हे खरीपातील मुख्य पिकं आहेत. मागील वर्षी सोयाबिनला अतिशय कमी भाव मिळाला. तशीच स्थिती कपाशीचीही होती मात्र तरीही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सोयाबिनच्या पेरणी क्षेत्रात सुमारे १० हजार हेक्टरने घट येणार आहे. तेवढीच मात्र कपाशीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.मागील वर्षी जिल्ह्यात सोयाबिनच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. जवळपास २ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी जिल्ह्यात झाली होती. कारण मागील दोन ते तीन वर्षांपासून कपाशीला खर्चाच्या तुलनेत भाव नाही. यंदाही तशीच परिस्थिती होती. मात्र सोयाबिनची अवस्था त्यापेक्षाही वाईट झाली होती. अनेक शेतकऱ्यांना तर सोयाबिन विक्रीतून बि बियाणे, पेरणी व मशागतीचाही खर्च वसूल झाला नाही. कारण संपूर्ण हंगामात ४ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त भाव सोयाबिनला मिळाला नाही. भाव वाढणार या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबिन निघाल्यानंतर लगेच विक्री केले नाही मात्र भाव वाढण्याऐवजी उर्वरित. पान ४ खरीप हंगामासाठी बी. बियाणे तसेच खत बाजारात दाखल होत आहे. {पहिला माळा- गरोदर माता नोंदणी विभाग, एनसीडी विभाग, वैद्यकिय तपासणी कक्ष, सिकलसेल विभाग, आयसीटीसी विभाग व प्रयोगशाळा, सोनोग्राफी विभाग, ईसीजी विभाग, मॅट्रन कार्यालय, क्ष किरण विभाग, मॅमोग्राफ विभाग, ओटी, कुटूंब कल्याण विभाग, लसीकरण स्त्री बाह्य रुग्ण विभाग. दुसरा माळा वैद्यकिय अधीक्षक कार्यालय, रक्तशीत पेढी, मेळघाट विभाग, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य कार्यालय, प्रशासकिय कार्यालय. इमारतीच्या तळमजल्यावर नोंदणी विभाग, जन्म मृत्यू नोंदणी विभाग, आपत्कालीन सेवा कक्ष , रुग्णवाहिका विभाग, ऑपरेशन थिएटर, प्रसुती कक्ष, प्रसुतीपूर्व वॉर्ड, स्वयंपाक गृह, आयसीयु, चालक कक्ष, आरोग्यमित्र कक्ष, औषधी सोयाबिनवरील रोगांमुळे काही वर्षांपासून उत्पादकता कमी झाली कमी झालेले बाजार भाव या दोन कारणाने सोयाबिनचे पेरणी क्षेत्र यंदा कमी होणार आहे. यासह हवामान बदलाचा फटका जिल्ह्यात सोयाबिनला बसतो आहे. जमिनीत वारंवार सोयाबिन पेरणी सुरू असल्यामुळे पिक बदलसुद्धा आवश्यक आहे. या सर्व कारणांमुळे यंदा शेतकरी कापसाकडे वळत आहेत. बाजारातही कापसाला सोयाबिनच्या तुलनेत समाधानकारक भाव आहे. – डॉ. हेमंत डिके, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरीपात जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, वरुड, तिवसा, चांदूर बाजार आणि अचलपूर या चार तालुक्यांमध्ये कपाशीच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी चांदूर रेल्वेमध्ये ८ हजार हेक्टरमध्ये कपाशी होती यंदा ते क्षेत्र १४ हजार, तिवसा १५ हजार होते ते १८ हजार हेक्टरपर्यंत, वरुड २५ हजारांवरून ३० हजारांपर्यंत, चांदूर बाजार १५ हजारांवरुन २३ हजार तर अचलपूर १६ हजारांवरुन २५ हजार हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. याचवेळी मात्र भातकुली, दर्यापूर आणि मोर्शी तालुक्यात कपाशीच्या पेरणी क्षेत्रात घट अपेक्षित असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे.