pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण पथकाची कारवाई; 11 हजार 500 रुपयांचा दंड वसुल

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.7

तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपरीधारकांवर कोटपा- 2003 कायद्याअंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले. यामध्ये कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार एकुण 17 पानटपऱ्यांवर कारवाई करून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा, तंबाखु, मावा, जर्दा, खर्रा आणि सुट्टे सिगारेट इत्यादींची विक्री करणाऱ्या तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपरीधारकांवर कोटपा 2003 कायद्याअंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले. यामध्ये कायदयाअंतर्गत विविध कलमानुसार एकुण 17 पानटपऱ्यांवर कारवाई करून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई संपुर्ण जिल्हाभरात यापुढेही जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे, तरी पानटपरी धारकांनी अवैध्यरित्या कुठल्याही तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करु नये. ही कारवाही स्थानिक गुन्हे शाखेचे एस.पी.तनपुरे व आकृर धांडगे, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, समुपदेशक सोनाजी भुतेकर, मंगेश गायकवाड यांच्याद्वारे करण्यात आली. असे जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे