अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील सत्यभामा सिताराम
हनवते यांच्याकडून गोरगरीब तसेच गरजूंना त्यांनी आज पंधरा किटचे वाटप केले आहे. यामध्ये गहू ,तांदूळ ,साखर, तेल ,चहापत्ती, रवा, डाळ,शेंगदाणे, गुळ, अशा विविध 15 वस्तू या किटमध्ये समाविष्ट करण्यात आल्या
आहेत. या अगोदर सुद्धा त्यांनी कोरोना काळामध्ये गोरगरीब जनतेला धान्य तसेच किट वाटप केलेले आहे.
यावेळी उपस्थित पोलीस पाटील गौतम लिहिणार, श्री एस एस कंपनी मुंबईचे उद्योजक बाबासाहेब सीताराम हनवते, ठकाराम सीताराम हनवते, मनोज वाघमारे,
महेश अबोकर, गणेश राक्षे, अवधूत दांडेकर, निखील हनवते तसेच संपादक दै./सा. जालना कालनिर्णयचे प्रताप गायकवाड, संपादक साप्ताहिक भारतीय एकता
अखंडता चे राहुल गायकवाड, पुण्यनगरीचे ग्रामीण प्रतिनिधी गायके हे देखील
यावेळी उपस्थित होते. याबद्दल गरजूंनी हनवते परिवाराचे आभार मानले आहे.