pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्य व केंद्रातील निष्क्रिय सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे आज चिखल फेको आंदोलन

0 3 1 4 2 8
जालना/प्रतिनीधी,दि.20
राज्य व केंद्रातील भाजपा सरकार हे महाभ्रष्ट, शेतकरीविरोधी असून सरकारच्या या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार दि. २१ जून रोजी दुपारी २ वाजता शहरातील अंबड चौफुली येथे जालना जिल्हा काँग्रेसच्या वतीने सरकारच्या प्रतीमेस चिखल लावून चिखल फेको आंदोलन करण्यात येणार आहे.
   राज्य व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, सदर परीक्षा घेतल्याच तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात असतांना त्यांनाही मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. नीट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे.
महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील जनता या समस्यांचा सामना करत असतांना सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे कमिशन घेणे एवढेच काम करत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार उद्या शुक्रवारी राज्यभर राज्यातील महाभ्रष्ट,निष्क्रिय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने चिखल फेको आंदोलन करण्यात येणार आहे. जालना जिल्हा काँग्रेसच्या वतीने जालना शहरातील अंबड चौफुली येथे करण्यात येणाऱ्या या आंदोलनात
जिल्ह्यातील प्रमुख नेते, माजी मंत्री, आजी – माजी खासदार, आमदार, महिला काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक आदी सेल व विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद , जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे