जालना जिल्हयातील ८७ हजार ८३१ शेतक-यांच्या खात्यात ९८.५० कोटी रक्कम जमा
जालना/प्रतिनिधी,दि.18
जालना जिल्हयामध्ये माहे नोव्हेंबर व डिसेंबर, २०२३ या कालावधीत अवेळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानपोटी शासनाकडुन तालुका जाफ्राबाद, परतुर व घनसावंगी येथील २, ०७, २१० बाधीत शेतक-यांसाठी १९१.७६ कोटी रक्कम मंजुर करण्यात आलेली असुन ८५, ३४४ बाधीत शेतक-यांना ७२.२३ कोटी निधी यापुर्वीच वितरीत करण्यात आलेला आहे. परत शासनाकडुन दिनांक १७ जून २०२४ रोजी जिल्हयातील ३७, ६५२ शेतक- यांच्या खात्यात ४२.३२ कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. व E-KYC प्रलंबित असलेल्या २५,९५० शेतकऱ्यांनी तात्काळ ई-महासेवा केंद्रावर जावुन EKYC करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतक-यांना करण्यात येत आहे.
तसेच दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शासनाकडुन तालुका जालना, बदनापुर, भोकरदन, मंठा व अंबड येथील ४,०७,२१८ बाधीत शेतक-यांसाठी ३८२.२१ कोटी रक्कम मंजुर करण्यात आलेली असुन २,२१,६३३ बाधीत शेतक-यांना २३७.३१ कोटी निधी यापुर्वीच वितरीत करण्यात आलेला आहे. परत शासनाकडुन दिनांक १७ जून २०२४ रोजी जिल्ह्यातील ५०,१७९ शेतक-यांच्या खात्यात ५५.१८ कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. व EKYC प्रलंबित असलेल्या ३३,११३ शेतकऱ्यांनी तात्काळ ई-महासेवा केंद्रावर जावुन EKYC करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतक-यांना करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.