pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

९८ व्या कविसंमेलनातून कवीनी गायले थंडी व थर्टीफस्ट वर कविता.

0 1 7 4 1 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

कोमसाप(कोकण मराठी साहित्य परिषद ) व उरण मधुबन कट्टा विमला तलाव यांच्या माध्यमातून विमला तलाव येथे महिन्यातून एकदा कवी संमेलन भरविले जाते. यावेळीही विमला तलाव येथे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. या कवी संमेलनाचे अध्यक्ष- सूर्यकांत दांडेकर,स्वागताध्यक्ष-सि.बी.म्हात्रे होते.कवितेचा विषय – आला थंडीचा महिना आणि थर्टीफस्ट मजा आणि सजा असे होते.यावेळी निमंत्रित कवी म्हणून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री -प्रज्ञा म्हात्रे नवी मुंबई तसेच नरेश पाटील अलिबाग यांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. या कार्यक्रमात गणेश नामदेव पाटील वशेणी भजन सेवा,ज्ञानेश्वर कोठावडे- सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन आय हायस्कूल शैक्षणिक सेवा,चंद्रकांत कडू सोनारी
जेष्ठ गीतकार साहित्यिक सेवा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कु.अनुज शिवकर ,रमण पंडीत, भगवान म्हात्रे,रामचंद्र म्हात्रे,संग्राम तोगरे,मारूती तांबे,भालचंद्र म्हात्रे आदी कवीनी या कवी संमेलन मध्ये भाग घेतला होता.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.निमंत्रतीत कवी प्रज्ञा म्हात्रे यांनी थर्टीफस्ट ची मजा करता करता तरूण पिढी आपले आयुष्य गमावून बसते , तेव्हा व्यसनाची उधळन करणा-या थर्टीफस्ट पासून आपण दूर रहायला हवे असे मत आपल्या काव्यातून व्यक्त केले.
सूर्यकांत दांडेकर यांनी प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला मधुबन कट्ट्यावर कवितांच्या माध्यमातून जेष्ठाच्या समस्या /सामाजिक समस्या मांडल्या जातात.आणि या समस्यामधूनही जीवनात आनंद कसा लुटावा हा काव्यानंद सुध्दा दिला जातो.असे मत व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे