नुकसान झालेल्या गारपीटग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी -शेतकर्यांची मागणी
जालना/प्रतिनिधी,दि.29
जालना तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीटमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान या बेमोसमी पावसाचा बऱ्याच भागात फटका बसला आहे या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, गारपीट व पावसामुळे फळबागासह ज्वारी,कापूस अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली जालना तालुक्यातील नेर सेवली
सोनदेव धारा ,येथे रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे वादळी वार्यामुळे झाडे उमळून पडली व घरावरचे पत्रे,सोलार पंपाची पाटी,पिकाचे कपाशी,मोसंबी द्राक्ष ,ज्वारी, आदी पिकाचे नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे