विकसित भारत संकल्प यात्रा 14 डिसेंबरला 12 गावात पोहोचविणार शासकीय लोक कल्याणकारी योजना
जालना/प्रतिनिधी,दि.13
केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दि. 14 डिसेंबर रोजी या गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा – विकसित भारत संकल्प यात्रा गुरुवार, दि. 14 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बेलोरा व कोपरडा, जाफ्राबाद तालुक्यातील सावरखेडा गोंधन व मंगरुळ, जालना तालुक्यातील सेलगाव हडूप व सावरगाव हडूप, मंठा तालुक्यातील तळणी व वडगाव सरहद, परतूर तालुक्यातील बामणी व शेवगा, अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी व लालवाडी येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.
या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदिवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागांच्या योजनांचा यात समावेश असणार आहे.