माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी आयोजित केलेल्या तक्रार निवारण बैठकीवर मराठवाडा शिक्षक संघाचा बहिष्कार
जालना/प्रतिनिधी, दि.3
मराठवाडा शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना तसेच उद्या होणाऱ्या तक्रार निवारण बैठकी मध्ये तक्रार केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की. उद्या मा. शिक्षणाधिकारी मंगला धुपे गायकवाड यांनी जी तक्रार निवारण बैठक राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना येथे ठेवली आहे. त्या बैठकीवर मराठवाडा शिक्षक संघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचे कारण असे की , फक्त मराठवाडा शिक्षक संघानेच शिक्षणाधिकारी यांना 31/12/24 रोजी जिल्ह्यातील शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एक बैठक आयोजित करावी अशी विनंती केली होती. परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिह्यातील सर्वच संघटनांना सदरील बैठकीसाठी पत्र देऊन बोलावले आहे. मागणी फक्त मराठवाडा शिक्षक संघाचीच असताना इतर संघटनांना एकत्र बोलविल्या मुळे बैठकीत गोंधळ होवू शकतो व ज्या उद्देशाने बैठक आयोजित केली त्यात अडचण निर्माण होवू शकते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न , तक्रारी सुटणार नाही.असे ठाम मत मराठवाडा शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आहे.त्यामुळे संघटनेने बहिष्काराचा निर्णय घेतला आहे . शिक्षणाधिकारी यांनी ज्या संघटनेने विनंती केली त्यांचीच बैठक वेगळी घ्यावी.. व समस्या सोडवाव्यात.
करिता उद्या कोणीही बैठकीस येवू नये असे आवाहन
अध्यक्ष
रमेश आंधळे,
सचिव संजय येळवंते,मार्गदर्शक डॉ मारोती तेगमपुरे,डॉ पुरुषोत्तम जुन्ने, कार्याध्यक्ष बाबासाहेब बिडवे, फरकुंद अली सय्यद,उपाध्याक्ष भिमाशंकर शिंदे,
जगन वाघमोडे, सहसचिव गणेश चव्हाण,दीपक शेरे,प्रद्युम्न काकड, जालना तालुकाध्यक्ष बी डी शेख,मार्गदर्शक शिवाजी केदार, प्रशांत वाघ,अंबड तालुकाध्यक्ष रमेश गाढे,सचिव गणेश मेहेत्रे,मार्गदर्शक अंनतराव जायभाये,विष्णु इप्पर,कैलास मान्टे भोकरदन तालुकाध्यक्ष आनंद वाघ,सरचिटणीस जनार्धन कुदर, जाफ्राबाद तालुकाध्यक्ष सुधाकरराव डोईफोडे,सचिव बबन लंके, मार्गदर्शक दत्ता देशमुख, गजानन बुधवत,परतुर तालुकाध्यक्ष विजयकुमार खरात, सचिव सोमदे,विजयकुमार म्हस्के,घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवहारी कायंदे, सचिव राधेश्याम चौधरी,ज्ञानेश्वर पवार,बदनापूर तालुकाध्यक्ष सुनिल म्हस्के, सचिव सुरेश बनकर,युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे,इम्रान सिद्धिकी, चरण बट्टेवार,अजित बारहाते,गणेश मुंडे,महिला शहराध्यक्ष ज्योती पांगारकर, शिरीन शहा शेख यांनी केले आहे