नांदेड येथे लोकशाहि दिनी तेरा महिन्यापासुन दिव्यांगाना न्याय मिळत नसेल? तर लोकशाही दिन कशासाठी? चंपतराव डाकोरे पाटील यांचा सवाल?
नांदेड/ प्रतिनिधी,दि.3
शासन जनतेच्या दारि येऊन दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार, शेतमजूर, शेतकऱ्यांच्या अनेक अडिअडचणी सोडविण्यासाठी लाखो रूपये खर्च करुन शासन जनतेच्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमाला जनतेने आपले प्रश्न सुटतील या आशेने या उपक्रमाला भरपुर प्रतिसाद दिला.
तसेच शासनाने जनतेच्या प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबार, लोकशाही दिनी घेऊन सर्व विभागप्रमुख यांच्या समक्ष जनतेच्या निवेदन स्वीकारून त्वरीत प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले जावे या उद्देशाने लोकशाही दिन घेतला जातो.
पण प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक दिव्यांचा घ्या लोकशाही दिनात निवेदन देऊन दर महा.तेरा महिन्यांपासून लोकशाही दिनात निवेदन देऊन दिव्यांगाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व दिव्यांगाना शेतीत जाणाऱ्या पांदण रस्ता बंद करणाऱ्या, दिव्यांचा शेतीत स्मशानभूमी करणाऱ्या ,दोषि विरोध तेरा महिन्यात जर न्याय मिळत नसेल तर दिव्यांग कायदा २०१६ कशासाठी व लोकशाही दिन घेण्याचा उद्देश तरी काय आहे?
असा संतापजनक सवाल दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले