pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

निराधारांचे रखडलेले मानधन लवकर द्या नसता जिल्हाधिकाऱ्यांना घेरावा घालणार- नंदा पवार

तहसील कार्यालय येथे महिला काँग्रेसच्या वतीने पार पडले ठिय्या आंदोलन

0 1 6 5 1 8
जालना/प्रतिनिधी,दि.2
जालना शहर आणि तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जाचक अटी लावल्यामुळे त्यांचे मानधन रखडल्याने  शुक्रवार रोजी तहसील कार्यालय जालना येथे जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नंदाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय येथे लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
राज्य शासनाच्या वतीने गरीब नागरीकांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरूष व महिला, अंध, अपंग, अनाथ, मुले, घटस्फोटीत महिला, परितक्त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. जालना शहर आणि तालुक्यातील या योजनेमार्फत मिळणारे मानधान अनेक दिवसांपासून रखडलेले होते. या योजनेचा निधी उपलब्ध झाल्यामुळे काही लाभार्थ्यांना मानधन वितरीत करण्यात आले. परंतू काही लाभार्थ्यांना जाचक अटी लावल्यामुळे त्यांचे मानधन थकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची वेळ येवून ठेपलेली आहे. काही दिवसांपासून हे लाभार्थी तहसील कार्यालयाला खेट्या मारीत होते. परंतू संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे या लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार यांनी तहसीलदार श्रीमती छाया पवार यांना या विषयाची पुर्ण कल्पना देवून लाभार्थ्यांना त्यांचे रखडलेले मानधन वितरीत करण्यासाठी विनंती केली होती. त्यांनी देखील या बाबीकडे गंभीरतेने बघीतले नाही. त्यामुळे शुक्रवार रोजी तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले असता तहसीलदार श्रीमती पवार यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. नायब तहसीलदार दिलीप सोनवने यांनी लाभार्थ्यांचे म्हणने ऐकून घेवून त्यांना त्यांचे मानधन रितसर वितरीत करण्यात येईल असे आश्वासन दिले असता महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार यांनी सांगीतले की, लाभार्थ्यांचे मानधन लवकर न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांच्यासमोर रास्ता रोखो करून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जावू दिले जाणार नाही. म्हणून प्रशासनाने या गोर-गरीब लाभार्थ्यांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी नंदा पवार यांनी केली.
या ठिय्या आंदोलनामध्ये मथुराबाई सोळुंके, नुर जहा शेख, शेख शफी, शेख निशा, मिनाबाई, गणेश चांदोडे, गजानन इंगळे, अलिम शेख, समद शेख, जावेद शेख, अमजद पठाण आदी कार्यकर्ते आणि लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे