देऊळगाव राजा होमगार्ड ते मुंबई गव्हर्मेंट रेल्वे पोलीस, संघर्षमय जीवनात यश परंतु रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि 10
(देऊळगाव राजा,
भीमराव चाटे सैनिक मित्र संकलन.)
देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे मुंबईत जीआरपी गव्हर्मेंट रेल्वे पोलीस विकी बाबासाहेब मुख्यदल हे ज्या रेल्वेची सुरक्षा करायचे त्याच रेल्वेच्या गर्दीचे बळी ठरले आहेत.
दोन लोकल रेल्वे एका वळणावर स्प्रिंग चा दबाव व वळणाच्या दबावा मुळे दोन रेल्वे मधील अंतर कमी होते.ही तांत्रिक अडचण आहे ती दुरुस्त करावी लागेल त्या ठिकाणी व फूटपॅड वर दरवाजाजवळ प्रवास करत असणारे प्रवासी यांना झकोला बसला व त्यातच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांची बॅगचा सुद्धा धक्का लागला आणि यात एकमेकांना घासून दहा प्रवासी पडले.त्यापैकी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यातीलच रेल्वे गव्हर्मेंट पोलीस कर्मचारी म्हणजे विकी बाबासाहेब मुख्यादल.
ही घटना समजताच गावावर शोककळा पसरली वडील बाबासाहेब व सासरे कमलाकर चंदनशिवे दोन्ही मिस्त्री काम करतात परिस्थिती हालाखीची आहे मुलाने खूप मेहनत केली प्रॅक्टिस केली देऊळगाव राजा शहरांमध्ये दोन वर्ष होमगार्ड नोकरी केली मग पुन्हा गव्हर्मेंट रेल्वे पोलीस मुंबई येथे नोकरी लागली दोन वर्ष भाड्याच्या खोलीत राहून कल्याणला एक घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केलं पत्नी दिपाली मुलगा प्रणय सोबत पाच जूनला विकी चा वाढदिवस झाला सुखाचे दिवस आले होते रात्रीची ड्युटी करून परत येण्याचा फोन विकिने केला ते शेवटचेच बोलणे झाले.
विकीने त्याच्या तीन वर्षाच्या प्रणयला जय हिंद सॅल्यूट करायचा शिकवला ते शेवटचेच शिकवणे झाले.
ज्या रेल्वेच्या सुरक्षेची जिम्मेदारी त्याच रेल्वेच्या गर्दीचा बळी विकी बाबासाहेब मुख्यदल ठरला.
रेल्वेच्या संख्या वाढणार नाही,रेल्वेचे डबे वाढणार नाही,रेल्वेची गर्दी ही कमी होणार नाही,हे रेल्वे प्रशासनाचे धोरण बदलेल तेव्हा बदलेल परंतु;माणुसकी म्हणून दरवाज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपण मागे झुकत आत घेणे हीच माणुसकी.आज विकी मुख्यदल कर्तव्यावर शहीद झाला हे खूप मोठे दुर्दैव आहे परंतु अजून कोणी विकीचा बळी जायला नको असे चंदनशिवे म्हणाले.
माजी सैनिक तथा पोलीस दिनकर चंदनशिवे, माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे,उपसरपंच सुधाकर चंदनशिवे व कमलाकर चंदनशिवे यांनी बुटखेडा येथे मोठ्या थाटामाटात दिपालीचं विकी सोबत लग्न लावलं,संसार वेल फुलली पण बहरण्याअगोदरच काळाच्या दुर्दैवी घटनेने तीन वर्षाच्या चिमकुल्या प्रणय ला पोरके केले.
दोन दिवसापासून घटना जुमडावासी व सर्व नातेवाईक दुःखच्या सागरात बुडाले होते,आज सकाळीच भिवगाव पासून ते जुमडापर्यंत तिरंगा घेऊन देशभक्ती गीतात,गगनभेदी देशभक्ती घोषणात मुंगी पावलाने दोन तास रॅली चालली अनेकांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली दिली त्यात
तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,ठाणेदार आशिष रोही,डॉ.रामप्रसाद शेळके,सतीश भाऊ कायंदे,दादाराव भाऊ खार्डे,दिलीप भाई खरात,छ. संभाजीनगर महानगरपालिकाचे उप आयुक्त संजयजी सुरडकर,माजी सैनिक कॅप्टन अशोकजी सुरडकर तलाठी श्रीमंत पांडव,भीमराव चाटे माजी सैनिक राजीव शिरसाट तसेच राजकीय शैक्षणिक अधिकारी,पुढारी हजारोच्या संख्येने समुदाय अंत्यविधीसाठी हजर होता.बुलढाणा जिल्हा पोलीस पथक यांनी शाही ईतमामात बिगुल वाजवून सलामी दिली हवेत तीन फेरी गोळ्या झाडून सलामी शस्त्र रायफलला संगीत लावून सलामी दिली व चिमुकल्या तीन वर्षाच्या प्रणय ने चिताअग्नीडाव दिला प्रसंगी सर्व जनसमुदायाचे हृदय पिळवटून गेले व आसवांच्या धारा प्रत्येकाच्या डोळ्याला लागल्या होत्या.