pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद

सुमारे दीड तास वाहतुक कोलमडली :  दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा

0 3 2 7 2 6
जालना/प्रतिनिधी,दि.12
निवडणुकीपुर्वी सत्ताधारी पक्षाने राज्यातील
जनतेला अनेक आश्वासने दिली. परंतु निवडणुकीनंतर सत्ता प्राप्त होताच या सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनांकडे त्यांनी स्पशेल
पाठ फिरवल्याने आता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आश्वासनांबाबत `क्या हुआ तेरा वादा’ अशी आंदोलनांची शृंखला उभी करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आज १२ जुन रोजी याच आंदोलनाच्या शृंखलेतील जिल्हास्तरीय चक्का जाम आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांच्या नेतृत्वात जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर करण्यात आले.
यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे,उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, रमेश गव्हाड, भगवानराव कदम, मुरलीधर शेजुळ,हनुमान धांडे, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे
भरत सांबरे, गणेश काळे,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण,कैलास पुंगळे, कुंडलिक मुठ्ठे, देवनाथ जाधव, मुरलीधर थेटे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले,दुर्गेश काठोठीवाले, महिला आघाडीच्या मंगल
मेटकर, दिपक रणनवरे, बबनराव खरात, रविकांत जगधने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, राज्यातील
शेतकरी, कष्टकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. याला शासनाने धोरणं जबाबदार असून निवडणुक काळात शेतकरी बंधू-भगिनींना मोठ-मोठी आश्वासने देण्यात आली.त्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा या आंदोलनांच्या माध्यमातून शासनाला जाब विचारत आहोत. सध्याचे सरकार हे
उद्योगपतींना धार्जिन आहे. वेळवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेेक्षणत देशात उत्तर प्रदेश, बिहार यापेक्षाही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबीचे प्रमाण जास्त आहे. शेतकर्‍यांच्या देशात होणार्‍या एकुण
आत्महतेपैकी ३९ टक्के आत्महत्या या केवळ महाराष्ट्रातील असल्याचे अंबेकर म्हणाले. शेतकर्‍यांची उत्पादकता वाढविणे, त्यांच्या मालाला योग्य भाव
देणे, कापूस, सोयाबीन यांना मागील दहा वर्षांपासून कोणताही भाव वाढ केली नाही. तेच भाव आजही कायम आहेत. आयात निर्यातीचा फटकाही शेतकर्‍यांना बसत
आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. राज्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज असून आजही कोरडवाहू शेती मोठ्या
प्रमाणावर आहे.खतांच्या वाढलेल्या किंमती, शेतकर्‍यांवरील कर्ज, यामुळे शेतकरी आत्महत्या करतो,तरीही त्याच्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन हजारो
कोटींचे रस्त्यांचे प्रकल्प हाती घेतले गेले. समृध्दी महामार्ग, शक्तीपिठ मार्ग असे गरज नसलेल्या या प्रकल्पात टाकून मात्र शेतकर्‍यांच्या जमीनी
कवडीमोल भावाने व बळजबरीने संपादन केल्या जात आहेत. जालना ते नांदेड समृध्दी महामार्गात जाणारी कोट्यावधी रुपये एकर किंमत  असलेली जमीन शासन
केवळ २० ते २५ लाख रुपये एकर प्रमाणे दादागिरी करुन संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. जालना -नांदेड समृध्दी मार्ग व शक्तीपिठ मार्ग यांना
शेतकर्‍यांचा व जनतेचा तीव्र विरोध आहे. शेतकर्‍यांना संपादीत जमीनींचा मोबदला बाजारभावा प्रमाणे देण्यात यावा.यासाठी शेतकरी मागील चाळीस
दिवसांपासून आंदोलन करीत आहेत त्यासही शिवसेनेचा पाठींबा असल्याचे अंबेकर यांनी सांगितले.
तर जुन्या रस्त्यांच्या सुधारणा करण्याऐवजी गुत्तेदार व उद्योगपतींच्या कल्याणासाठी हे मार्ग करण्याचा घाट घालण्यात येत आहे. १९७२ ला दुष्काळ
पडला व शेतकरी अडचणीत आले. तेंव्हा तत्कालीन सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून काम केले.
शेतकर्‍यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, शैक्षणिक संस्थांना परवानग्या दिल्या. मात्र आता या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करुन निवडणुकीपुर्ते आश्वासने देणे व नंतर आपली भाषा सरकार बदल आहे. त्यामुळे
शेतकरी प्रचंड अडचणीत असल्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करावी, या साठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाही सरकारला जाग न आल्यास पुढे मंत्री, मुख्यमंत्री यांच्या विरोधातही तीव्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, सत्ताधारी हे केवळ स्वार्थी
धोरणांकडेच लक्ष देत आहेत. त्यांना सामान्य जनता व शेतकर्‍यांशी काहीही देणे घेणे नाही. आगामी काळात अशा या लबाड लोकांना धडा शिकविण्याची वेळ
आल्याचे सांबरे म्हणाले. तर जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी अशोक आघाव, प्रदीप बोराडे, भरत पंडीत, मधुकर खरात, जनार्धन झोरे, महेश
पुरोहित, संदीप कंटुले, दिनेश काकडे, पंडीत गावडे, जगन दुर्गे, बंडू पागिरे, डॉ. राजेश राऊत, मंगेश गव्हाड, अश्विन अंबेकर, जे.के.चव्हाण,गंगुबाई वानखेडे, विजय पवार, संदीप झारखंडे, संदीप नाईकवाडे,किशोर नरवडे, प्रभाकर उगले, प्रभाकर घडलिंग, किशोर नरवडे, बाबुराव
कायंदे, संदीप मगर, हरी शेळके, रमेश वाघ, विष्णुपंत गिराम, जनार्धन गिराम, माऊली गोरे, रामजी गायकवाड, संजय जाधव, रामेश्वर फंड, परमेश्वर मात्रे, केशव क्षीरसागर, अनिस पठाण, बंडू केळवâर, विठ्ठल पडूळ, परमेश्वर डोंगरे, दिलीप डोंगरे, वसीम खान, बळीराम ढवळे, विकास बोर्डे, अर्जुन ठोंबरे, अनिल अंभोरे, संजय रत्नपारखे, शेख नईम, वैâलास मिसाळ, बबन काजळे,
सुभाष पिंताबरे, मदनराव खरात, अजय रोडिये, गणेश लाहोटी, संदीप रोटे, रमेश तुंगेवार, किरण तुमा, संतोश जमधडे, जीवन खंडागळे, योगेश जाधव, संतोश
खरात, गोविंद राठोड, गुड्डू खान, सतिष मुंढे, योगेश जाधव, नितीन वानखेडे,नितीन गुबरे, तुकाराम भुतेकर,उध्दव गायकवाड, अशोक बंकट, माधव काळे, सतिष मुंढे, वसंत घुगे, दुर्गेश शिंदे, किशोर कोळेश्वर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 7 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे