pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिवुर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन

0 1 7 4 0 8

 कन्नड/ कृष्णा घोडके,दि.20

वैजापूर तालुक्यातील शिवूर गाव येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिवुर येथे शेतकरी मेळाव्यासाठी आलेले असतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा औरंगाबाद पश्चिम च्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोंढरा हवेली गावात प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून येथील लढवय्या भीमसैनिक कालकथित अक्षय भालेराव यांची जातीयवाद्यांनी केलेली हत्या व इतर जातीय अत्याचाराच्या घटना या बाबत निवेदन देण्यात आले. या वेळी पुढील मागण्या करण्यात आल्या नांदेड जिल्ह्यातील बोंढरा हवेली गावात प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून लढवय्या भीमसैनिक कालकथित अक्षय भालेराव यांची जातीयवाद्यांनी हत्या केली, तसेच लातुर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मांतग युवक कालकथित गिरधर तपघले यांची केवळ ३०००/ – रुपये च्या सावकारी पैशा साठी हत्या केली, अकोला जिल्ह्यातील व मुंबईत राहत असलेली बौद्ध युवती कालकथित हिना मेश्राम या बौद्ध युवती ची बलात्कार करून हत्या केली कन्नड तालुक्यातील सेलगाव येथील शबाना पटेल या मुस्लिम महिलेला घरगुती कारणावरून आरोपींनी व पोलीसांनी घरात घुसून व विवस्त्र करून जबर मारहाण केली तसेच बीड जिल्ह्यातील मुस्लिम युवक झरीन खान या मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली महाराष्ट्रातील मागासवर्गीय, बौद्ध, अनुसूचित जाती जमाती, मुस्लिम,भटके विमुक्त,आदि समुहावरील जातीय अन्याय अत्याचारा च्या घटनां मध्ये वाढ झालेली आहे या वर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या समुहांना न्याय मिळवून द्यावा, संरक्षण मिळवून द्यावे, महाराष्ट्र राज्य शासना कडुन ५० लाख रुपये चे आर्थिक साहाय्य प्रत्येक कुटुंबाला मिळवून द्यावे, तसेच प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी मिळाली पाहिजे, व या कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने वंचित बहुजन आघाडी जिल्हा औरंगाबाद पश्चिम चे जिल्हा सचिव आयु.लक्ष्मण धनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा औरंगाबाद पश्चिम चे जिल्हा पदाधिकारी आयु.अशोक पगारे, जिल्हा सदस्य आयु.प्रकाश सोनवणे,शिवुर गावचे आयु.दिलीप आढाव, आयु.पुंजाजी पगारे,आयु.जगन मगन पगारे,आयु.प्रल्हाद बोर्डे,आयु.देवचंद धनेश्वर,व इतर उपस्थित होते या वेळी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रश्नांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून आवाज उठविला जाईल व संबंधित कुटुंबाला व समुहाला न्याय मिळवून देवू व इतर सर्व मागण्यां देखील सरकारकडून मंजुर करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाहीर केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे