जालना जिल्ह्यात “विकसित भारत संकल्प यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोककल्याणकारी शासकीय योजनांची जनजागृती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शनिवार, 23 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक
जालना/प्रतिनिधी,दि.22
केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जालना जिल्हयात “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शनिवार, दि. 23 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार “विकसित भारत संकल्प यात्रा” – विकसित भारत संकल्प यात्रा शनिवार, दि. 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जालना तालुक्यातील मोहाडी व खांबेवाडी, परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी व पिंपरुळा, मंठा तालुक्यातील जयपूर व शिवनगरी, जाफ्राबाद तालुक्यातील सावंगी व गोधनखेडा, भोकरदन तालुक्यातील गारखेडा/ जोमाला व नांजा/शिरसावर, अंबड तालुक्यातील धाळसखेडा व पराडा, येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.
विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.