17 सप्टेंबर:मराठवाड्याचा स्वातंञ दिवस

जालना/प्रतिनिधी, दि.17
जालना तालक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.परमेश्वर गरबडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. यावेळी शाळेचे सचिव सौ.लताताई गरबडे गावातील संरपच तसेच गावातील ग्रामपंचायत समिती सद्स प्रतिष्ठित नागरीक व शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी. वाघमारे.यांनी शुभेच्छा दिल्या… हा मराठवाड्याच्या त्यागाचा,शौर्याचा,संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे….
स्वामी रामानंदतीर्थ,गोविंदभाई श्राॅफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मराठवाठा मुक्तीसंग्रामाचं महत्त्व देशाच्या स्वातंञ्यलढ्याइतकंंच आहे….
या नतंर शाळेचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण केले बोलताना म्हणाले की देशाची एकता,अखंडता,सार्वभौमतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या,त्याग केलेल्या वीर सुपुञांचा देश नेहमीच रूणी राहील,अशा शाळेचे मा.परमेश्वर गरबडे साहेब यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचे स्मरण करून मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्चा शुभेच्छा दिल्या निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दल,स्वातंञ्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे…..
मराठवाड्याचा इतिहास संघर्षाचा राहिल आहे.हा संघर्षाचा वारसा कायम ठेवून भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकास व्हावा अशाप्रकारे मार्गदर्शन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित
शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..श्रीमती.एस.आर.कुलकर्णी,
वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस.बी.राऊत,श्रीमती.एम.ए.खरात
आदीची उपस्थिती होती.