मराठा आंदोलन करते मनोज जारंगे पाटील व मराठा समाज यांना सरकार व दुवा वेठीस धरीत आहे – प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना
जालना/प्रतिनिधी, दि.9
मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर जाहीर सांगितले हे राजकीय गेंड्याच्या कातड्याची लोकप्रतिनिधी हे लोक तुम्हाला आरक्षण देतील किंवा नाही आज काही सांगता येणार नाही, परंतु हा आज ही गोष्ट समोर आली काल आंतरवाली सराटी येथून शिष्टमंडळ व दुवा अर्जुन खोतकर हे मुंबईला गेले होते, मा.मुख्यमंत्री. मा. उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक झाली त्या बैठकी नंतर श्री.अर्जुन खोतकर म्हणाले बंद पाकिटात महाराष्ट्र शासनाचा जी.आर आहे, ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक झाली त्याच वेळी शिष्टमंडळात सोबत चर्चा करून शिष्टमंडळातील सदस्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत फोनवर चर्चा करायला हवी होती, त्यामधून वेळ वाचला असता म्हणून तुम्ही सरकार जारंगे पाटील यांचे आंदोलन दिशाहीन करायच्या विचारात आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो, कारण आज अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटील यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर जरांगे पाटील यांचे मत काय आहे ते आजच दुवा अर्जुन खोतकर यांनी मुंबईला जाऊन उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन जरांगे पाटील यांचा निर्णय कळवायला हवा होता, परंतु असे होतांनी दिसले नाही,कारण अर्जुन खोतकर यांची बॉडी लँग्वेज अशी दाखवते की जरांगे पाटील यांना वेठीस धरायचे असेच या मधून दिसून येत आहे? कारण खोतकर म्हणाले काही दिवस थांबावं लागेल याचा अर्थ काय, एक व्यक्ती मराठा समाजाला आरक्षण मिळावा मराठा समाजातील मुलाबाळांचे भलं व्हावं म्हणून आज दहा दिवसापासून अन्नाचा पोटात कण हि नाही, त्या माणसाला थांबावे लागेल हे शब्द बरोबर आहेत का ? या बाबत सखल मराठा समाज नाराज आहे, व मराठा समाजाला व जारंगे पाटील यांना विनाकारण वेठीस धरू नये कारण मराठा आंदोलन शांततेत चालू आहे, आणि ते शांततेचा चालू राहील शांतते आंदोलन करा असे आव्हान मनोज जारंगे पाटील यांनी केले आहे, परंतु जारंगे पाटील किती दिवस उपाशी राहणार आणि या मधून काही वेगळ्या गोष्टी घडल्या तर याला जबाबदार सरकार व दुवा हेच असणार आहेत, परंतु सरकारला विनम्र आवाहन करण्यात येते सखल मराठा समाजाला आरक्षण द्या तत्काळ प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे, ही मागणी तत्काळ मान्य करावी कारण आजपर्यंत समाज संयमाने आंदोलन करीत आहे पुढे ही करील आम्हाला खात्री आहे, एखादी व्यक्ती एखादा समाज शांततेच्या मार्गाने उपोषण करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मागणी करीत आहे त्या माणसाला व समाजाला वेठीस धरणे बरे नाही…