लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगासाठी राखिव असलेल्या निधीपासुन दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या ऊमेदवारास सतेपासुन वंचीत ठेवावे असे आवाहन दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले
नांदेड/प्रतिनिधी,दि.8
दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून अनेक कायदे संसदेत मंजुर केले जातात,तेच लोकप्रतिनिधी कायदा नियम निकष पाळत नसतील तर दिव्यांगासाठि केलेल्या कायदा फक्त कागदावरच ठेवत असतील तर दिव्यांग कायदा 2016चा कायदा कशासाठी ?
निवडणूक आलि कि अनेक उमेदवार मतांची भिक मागताना मी मतदाराचा सेवक आहे.दिनदुबळ्याचा कैवारी म्हणुन मते मागतात सत्तेत गेल्यानंतर दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द,निराधाराची साधी त्यांना आठवण येत नाहि. दिव्यांगाच्या समस्या संसदेत कधी मांडत नाहि.दिव्यांग बांधव हक्कासाठी प्रशासनास जागे करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन,धरने,मोर्चे करताना कधी लोकप्रतिनिधीला दिसत नसल्यामुळे ते समोर येत नाहित.
ते फक्त सत्तेत गेल्यानंतर आपल्या दहा पिढीची कमाई करून वंश पिलावळ आपली सत्तेत कशी गेली पाहिजे म्हणून या पक्षातुन त्या पक्षात उडी मारून सत्तेसाठी लाचार झालेल्या उमेदवारांना दिव्यांगानी त्यांची जागा मतदान रूपाने दाखऊन त्यांना सतेपासुन वंचीत ठेवावे असे आव्हान दिव्यांग,वृध्द, निराधार, शेतमजुर,गावरान पट्टेधार,सवलती पासुन वंचीत असलेल्या मतदारांनी मतदान रूपाने आपली शक्ती दाखवावी असे आव्हान दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले आहे.