pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांग, वृध्द , निराधारांना हक्कासाठी १० सप्टे.२०२४ च्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी व्हा – चंपतराव डाकोरे पाटिल

0 3 2 1 8 2

नांदेड/ प्रतिनिधी,दि.25

महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाने मतदान डोळ्यासमोर ठेऊन ज्यांना गरज नसेल अशा योजना जाहिर करून मतदान वळविण्याचा व तिर्थयात्रा घडविण्यासाठी प्रयत्न केला जातो . पण मंदिर,मजिस्दमधील ईश्वरासारखा जिवंत असलेला त्याला खरी गरज असलेल्या
गरजु उपेक्षित,दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या खऱ्या ईश्वररूपि दिव्यांग,वृध्द, निराधाराना आधार देणे गरजेचे असताना अर्थसंकल्प बजेट मध्ये कोणतीहि तरतूद केलेली नाही. ज्याना चालता येत नाही,दिसत नाहि,जगात काय चालले ते ऐकु येत नाही,बोलता येत नाही अशा दिव्यांग संघटनेच्या वतीने शासन, प्रशासनास जागे करण्यासाठी अनेक सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यानंतर वारंवार आश्वसनाचे गाजर दाखविले आहे.
आपले राज्य देशात महसुली मध्ये नंबर वन असताना सुद्धा दिनदुबळ्याना मानधनात वाढ होत नाहि, पण आमदार,माजी आमदाराना वाढ होते, आपल्या शेजारच्या राज्य आंद्राप्रदेश सरकारने दिव्यांगाना दरमहा सहा हजार रू वाढ केली त्याच प्रमाणे आपल्या सरकारने दिव्यांग, वृध्द निराधाराना मानधनात वाढ करून आधार दिला पाहिजे पण तसे सरकारने केले नाही.
ं लोकप्रतिनिधी,शासन, प्रशासन थोडा विचार केला पाहिजे दरमहा दिड हजार रुपयात ते जीवन कसे जगत असतील त्यांना चहासाठी दोन वेळा दुध, साखर पती तरी दररोज मिळणाऱ्या पन्नास रू.मिळते काय? आपले जिवन जगण्यासाठी किमान दोन वेळा जेवन दोन वेळा चहासाठी किती खर्च येत असेल ते कसे जगत असतील ते लोकप्रतिनिधी कळत असताना दिनदुबळ्यासाठी का बरे असे वागत असतील तसेच आपण मानवि दृष्टिकोनातून विचार का बरं करत नसतील ते स्व:तासाठी सत्तेचा उपयोग करून लोकप्रतिनिधी आमदार, खासदारांचे मानधन वाढते, कर्मचाऱ्यांना पगारी महागाईमुळे वाढतात तसेच उपेक्षित समाजाला न्याय मिळावा म्हणुन दिनदुबळे मतांचे शिक्के देऊन उपेक्षिताला न्याय मिळावा म्हणुन प्रतिनिधी पाठवतात तेच प्रतिनिधी दिनदुबळ्याचा विचार करीत नसल्यामुळे मतदान न करता दिनदुबळे घरी बसतात तेव्हा शासन, प्रशासन मतांची टक्केवारी वाढावी म्हणून दिव्यांगाच्या घरी मतदान केंद्र नेले जाते.
आता दिव्यांग, वृध्द निराधार,जागे झाले पाहिजे आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्षाशिवाय आपली शक्ती निर्माण केल्याशिवाय हे लोकप्रतिनिधी आपला विचार करत नसल्यामुळे नांदेड जिल्हातील सर्व उपेक्षित दिव्यांग, वृध्द निराधारांच्या मानधनात वाढ व ईतर सवलती न्याय हक्क द्या नसेल तर जंगली प्राण्यांप्रमाणे जिवन जगने शक्य नसल्यामुळे आम्हा दिव्यांग जन्मातुन मुक्त करावे म्हणून दिव्यांचा, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, मंत्रीमहोदय यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन पाठविले जर दि.१० सप्टेंबर २०२४ पर्यंत न्याय हक्क नाहि देता येत असेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दररोज अनेक प्रकारचे सनदशिर मार्गाने बे मुध्दत धरने आंदोलनात दिव्यांचा, वृध्द निराधार बांधवांनी सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांचा,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
मराठवाडा अध्यक्ष सुधाकर पिलगुंडे,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि.सचिव अनिल रामदिनवार, नागोराव बंडे, जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,उमेश भगत, मगदुम शेख, दादाराव कांबळे,दिंगाबर लोणे, गजानन वंहिदे, दत्तात्रय सोनकांबळे, राजेश सुकळकर, बबिता मारबते,रेवा राठोड,हेमसिंग आडे,दिंगाबर लोणे , नामदेव बोडके,चांदराव चव्हाण , मिलिंद चिरोटे,चांदु गोरटकर,शेख हानिफ,इत्यादी पदाधिकारी यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे