जाफ्राबाद येथे समता परिषदेची आढावा बैठक संपन्न.
टेंभुर्णी/ सुनिल भाले, दि.20
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक गेस्ट हाउस जाफ्राबाद येथे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकरजी झरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नवनिर्वाचित जालना जिल्हाध्यक्ष मधुकरजी झरेकर यांच्या निवडीबद्दल तालुक्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ओबीसी समाज बांधवांच्या अडचणी समता परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे आश्वासन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांनी दिले. ओबीसी समाज बांधवांना संघटित करून प्रत्येक गावात समता परिषदेच्या शाखा उघडण्यात येईल. या बैठकीसाठी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रवींद्र उखर्डे यांनी आयोजन केले . समता परिषदेचे जालना शहराध्यक्ष दीपक वैद्य , जालना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, परतुर शहराध्यक्ष फटिंग, जाफ्राबाद तालुका कार्याध्यक्ष नंदकिशोर जाधव, तालुका प्रसिद्धी प्रमुख राजू घोडके, शहराध्यक्ष विजय बोर्डे, टेंभुर्णी शहराध्यक्ष पुंजाराम धनवई, माजी सरपंच गणेश धनवई, उपसरपंच संतोष पाचे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता सोनसाळे ,सचिन देशमुख, संतोष भागवत ,रमेश उखर्डे ,रामेश्वर जायभाये, खासगाव शहराध्यक्ष गणेश जाधव, तालुक्यातील समता सैनिक व समाज बांधव उपस्थित होते.