वादळ वारे व गारांच्या पावसामुळे कांदा पिक व फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
वैजापूर/ जितेंद्र ठेंग,दि.29
वैजापूर तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी काल झालेल्या वादळ वारे व गारांच्या पावसामुळे कांदा पिक व फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काय झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले यामध्ये मुख्यतः कांदा पिक व फळबाग मध्ये मोसंबी व आंबे यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुसाट्याच्या वाऱ्यामुळे मोसंबी आलेल्या आंबे बहार ची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे छोटी फळे मोठ्या प्रमाणात गळ झाले आहे त्यामुळे फळबाग शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान झाले काबाड कष्ट करून कांदे पिकवले मार्केटला नेले तर कांद्याचे भाव नाही घरी ठेवले तर पावसाने खराब होत आहे अशा दुविधा परिस्थितीत शेतकरी सापडला आहे मार्केटमध्ये शेतमालाला भाव नाही जी पिके शेतात पिकवला पिकवला त्यास निसर्गाने अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे