उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसच्या कविता संतोष पाटील यांची बहुमताने निवड झाली. भाजपच्या प्राची पाटील विरुद्ध महाविकास आघाडीच्या कविता पाटील यांच्यात थेट लढत झाली. त्यात काँग्रेसच्या कविता पाटील या दणदणीत मतांनी विजयी झाल्या. यावेळी सरपंच सविता मढवी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने विजयाचा जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नवनियुक्त उपसरपंच कविता पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “गावातील विकासकामे व्हायला हवीत. रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला मिळायलाच हव्यात. त्यासाठी सिडकोसोबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा करायला हवा. मी आपल्यासाठीच आहे, पण ‘देरे हरी खाटल्यावरी’ हे चालणार नाही. आपण लढलो पाहिजे. दिबांनी आपल्याला १९८४ च्या शेतकऱ्यांच्या गौरवशाली व शौरशाली लढ्याने न्याय हक्क दिला आहे. सिडकोने ५ टक्के निधी प्रत्येक गावाला द्यायला हवा, पण तसे होताना दिसत नाही. लढल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही, हा भूमिपुत्रांचा इतिहास आहे. त्यामुळे दि. बा. पाटील साहेबांची हक्कांसाठी लढण्याची भूमिका आपल्याला विसरून चालणार नाही. सिडकोसोबत लढताना परिस्थितीनुसार रस्त्यावर उतरावे लागेल. आजचा विजय हा महाविकास आघाडीचा असून उरणमध्ये आगामी काळात परिवर्तनाची ही नांदी आहे.”
यावेळी काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा रेखा घरत, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, संतोष पाटील, उरण शिवसेना तालुका प्रमुख बी. एन. डाकी, अविनाश म्हात्रे, विश्वास तांडेल, रवी पाटील, महादेव बंडा, मुरलीधर ठाकूर, नितीन मढवी, आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कविता पाटील यांची निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
3 hours ago
अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा जालना जिल्हा दौरा
3 hours ago
मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न
3 hours ago
जाफ्राबादमध्ये थरारक घटना; मिरची व्यापारी शेख मोहसीन यांची हत्या
3 hours ago
टेंभुर्णी चे आदर्श शिक्षक शेख जमीर यांचा आदर्शवत उपक्रम, जुन्या सहकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना भेटून नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न
16 hours ago
मनसेच्या निवेदनाला यश ; जाफ्राबाद पंचायत समितीला अखेर गटविकास अधिकारी
18 hours ago
प्राणी व पशु पक्षांसाठी, झाडावर, जमिनीवर पाणी साठवण करा — दुर्गेश बनकर.
18 hours ago
उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने बळीराजा आक्रमक, हमीभावाने शेतकऱ्यांचा माल विकत घेणे, कृषी कर्जाची व्यवस्था निर्माण करणे, गरजेचे
18 hours ago
डिझेल पेट्रोल टंचाई मुळे मिरची उत्पादक शेतकरी प्रचंड तणावात! सरकारने व्यापार्यांना सवलत देवुन किंवा हमीभावाने हिरवी मिरची खरेदी करून निर्यात करण्याचे नियोजन करावे! – बोरसे गुरुजी
1 day ago
नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ,