pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

इन्फंट इंडिया या अनाथ आश्रमाची आनंदयात्रा शैक्षणिक सहल…

0 1 6 5 1 7

 

वडीगोद्री/तनवीर बागवान,दि.11

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे इन्फड इंडियामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आनंदयात्रा शैक्षणिक सहलीतील या लेकरांना शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानच्यावतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली.

या आश्रमातील लेकरांना आई-वडील नसल्याने मामा-मामी,आजोबा,चुलते हे नातेवाईक दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये घरी घेऊन जात नाहीत.त्यांना घराची खूप आठवण येते,औषध उपचारांमध्ये त्यांचे भविष्य नीट उमलत नाही.त्यामुळे घरपण हरवलेल्या आणि अकाली आई-वडिलांस मुकलेल्या या चिमुकल्यांची आनंदयात्रा आज सुरू होत आहे.

या आश्रमात एचआयव्ही पीडित अनाथ मुलं – मुलींचे शिक्षण,औषधोपचार,संगोपन व पुनर्वसन गेली २० वर्षापासून केले जाते.या संस्थेला कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही.संबंधित बालकांना समाजात मिसळता यावे,संवाद व्हावा,प्रेम मिळावे तसेच त्यांना नवनवीन अनुभवाची शिदोरी मिळावी व मुलांना ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी या उद्देशाने ही आनंदयात्रा शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी शांताई युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.व्ही.छल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे
पदाधिकारी तान्हाजी धुमाळ,ज्ञानेश्र्वर छल्लारे,अजय गावडे,गोरखनाथ कोल्हे,युनूस सय्यद,समाधान घागरे,सुनील गायकवाड,अजय काळे यांच्यासह विद्यार्थी यांनी फराळाची   करण्यासाठी परिश्रम घेतले.

या आनंदयात्रेला सहयोगी श्रीकांत उमरीकर,डॉ.एखंडे,बालकिशन बलदावा,पृथ्वा वीर,निलेश लोहिया,योगेश पाटणी,तात्याभैय्या वेरूळ,राजू छल्लारे,सतीश बचुटे,दत्तू भंडे,प्रकाश जाधव,कृष्णा राशिनकर यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे