महिला सशक्तिकरणावर भर असणारा अर्थसंकल्प- सौ संध्या देठे
जालना/प्रतिनिधी, दि.1
आज अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘सबका साथ सबका विकास’ विकसित देश व आर्थिक व्यवस्था भरभक्कम करणारा अर्थसंकल्प आहे असे मत सौ संध्या संजय देठे
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नगरसेविका जालना यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयाचा लाभ महिलांनी घेतला, व आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे, त्यात जालना जिल्ह्यामध्ये पंतप्रधान स्व निधी योजनेअंतर्गत दहा कोटी रुपये वाटप व छोट्या महिला व्यवसायिकांना लाभ,पीएम आवास योजनेअंतर्गत लाखो कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला.
अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताकडे वाटचाल असणारा अर्थसंकल्प आहे असे ही त्या पुढे म्हणाल्या.