सन 2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी, दि.3
सन 2024-25 या वर्षाच्या खरीप हंगामात खरीप गावांची तसेच ज्या रब्बी गावांत दोन तृतीयांश पेक्षा जास्त खरीपात पेरणी केलेली आढळली आहे, त्या गावांची पैसेवारी देखील खरीप हंगामात जाहीर करण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील खरीप पिकांच्या सुधारीत अंतिम पैसेवारीमध्ये खरीप गावे एकूण 515 व रब्बी गावे 456 अशा एकूण 971 गावांची खरीप हंगामी पैसेवारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील 971 गावांपैकी 50 पैशापेक्षा कमी 373 गावे तर 50 पैशापेक्षा जास्त 598 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. तर परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. जालना तालुका – 151 गावे, बदनापूर-92, भोकरदन-157, जाफ्राबाद-101, परतूर-97, मंठा-117, अंबड-138, घनसावंगी-118 गावांचा समावेश आहे. परतूर तालुक्यातील एकूण 98 गावांपैकी राणी वाहेगाव हे एक गाव बुडीत क्षेत्रात गेलेले असल्यामुळे 97 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.