स्वच्छता उपक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना/प्रतिनिधी,दि.10
आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी श्रमदान मोहीमेच्या माध्यमातून जालना शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जालना शहर महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले आहे.
शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता या उपक्रमांतर्गत मामा चौक, महावीर चौक,जिंदल मार्केट, अलंकार टॉकीज, सिंधी बाजार, खवा मार्केट,सुभाष रोड, मुख्य मार्केट,महेंद्र एजन्सी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. घनकचरा निर्मिती कमी करणे, कचरा segregate करून देणे, प्लास्टिकचा कमी वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. स्वच्छता अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका, विविध सामाजिक संस्था, शाळा- महाविद्यालये, नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जालना शहर महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले आहे.



