सुनंदा शंकरशेठ मुंबईकर यांचे दुःखद निधन
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
उरण तालुक्यातील वेश्वि येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श गृहिणी सुनंदा शंकर शेठ मुंबईकर(वय ८३)यांचे बुधवार दिनांक १४/५/२०२५ रोजी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या सुनंदा मुंबईकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक २३/५/२०२५ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे तर होम विधी रविवार दिनांक २५/५/२०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी वेश्वी येथे संपन्न झाला. रविवार दिनांक २५/५/२०२५ रोजी उत्तर कार्य विधी वेश्वी येथे त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला.विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे तसेच मुंबईकर कुटुंबियांतर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. स्व.सुनंदा मुंबईकर यांच्या निधना नंतर शनिवार दिनांक १७/५/२०२५ ते रविवार दिनांक २५/५/२०२५ या दरम्यान दररोज भजन तसेच ईतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्व. सुनंदा मुंबईकर यांच्या मृत्यू पश्चात तीन मुले, चार मुली, १४ नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.सुनंदा मुंबईकर या प्रेमळ व मन मिळावू व सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कुटुंब परिवाराने स्व. सुनंदा मुंबईकर यांना जड अंतकरणाने भावपुर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे.