pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण आगारातून गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्याची मागणी.

0 3 1 8 6 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण ही कोकण वासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून कोकणवासीयांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना नेहमी कटिबद्ध असते. कोकणातील कोकणीवासीयांचा महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. या गणेशोत्सव काळात मुंबई, नवी मुंबई,रायगड जिल्ह्यात काम करणारे उद्योग धंदा नोकरी करणारे चाकरमानी वर्गांना कोकणात जाण्यासाठी व गणेशोत्सव संपल्यानंतर परत उरण मध्ये येण्यासाठी तसेच जनतेचा प्रवास सुलभ करण्यासाठी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण बस आगारातून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर कणकवली देवरुख माणगाव खेड दापोली गणपतीपुळे आदि ठिकाणी ज्यादा बसेस सोडण्यात यावे.व तेथून परत उरण मध्ये येण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात यावेत.तसेच या बसेसची ऑनलाईन बुकिंग गणेशोत्सव पूर्वी करावे अशी मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणचे सचिव रविंद्र पांडुरंग चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाचे राज्य परिवहन महामंडळ मुंबईचे महाव्यवस्थापक व उरण बस आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे गणेशोत्सव व होळी सणाच्या काळात कोकणात जाण्यासाठी व कोकणातून परत उरण मध्ये येण्यासाठी ज्यादा बसेसची मागणी केली जाते. त्याला राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नेहमी उत्तम प्रतिसाद मिळत असतो.याही वर्षी राज्य परिवहन महामंडळ कोकणवासीय जनतेची मागणी लक्षात घेऊन कोकणात जाण्यासाठी व कोकणातून परत उरणला येण्यासाठी ज्यादा बसेसची व्यवस्था करेल अशी अपेक्षा कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणचे सचिव रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे