pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेतकरी कामगार पक्षाचा ९ जुलै रोजी एम एस ई बी उरण कार्यालयावर जाहीर मोर्चा.

0 3 1 2 9 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26

उरण तालुक्यात उन्हाळ्यात व आत्ता पावसाळ्यात उरण विद्युत मंडळाने विजेचा सततचा खंडित प्रवाह करून नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. हजारों नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा विचार करून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उरण एमएसईबी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा आयोजित केला आहे,असे उरण तालुक्यातील एमएसईबी कार्यालयात शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी अर्ज देऊन जाहीर केले.शेकाप ज्येष्ठ नेते रायगड भूषण प्रा एल.बी. पाटील,उरण महिला चिटणीस सिमा घरत, रमाकांत पाटील,शहर महिला अध्यक्षा नयना पाटील, सिताराम नाखवा, विनोद पाटील, रंजना पाटील इ.शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील गावागावांतील
विजेचे बरेच खांब जीर्ण झाले आहेत.विजेच्या तारा तुटल्या आहेत.पावसाळ्यात पडून मोठी
जीवितहानी दाट शक्यता आहे.तसेच ग्राहकांना दिली जाणारी भरमसाठ बिले येत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.लोकात असंतोष माजला आहे.
तरी नागरिकांना न्याय
मिळविण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे.आता हा मोर्चा जोरदार काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावोगाव प्रचार पुढच्या आठवड्यापासून सुरू करण्याचे आयोजन केले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 2 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे