pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत – निवडणूक निरीक्षक राजेश कुमार

0 1 7 4 6 7

जालना/प्रतिनिधी,दि. 27

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आपण निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर असून ही निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी दक्षतेने व समन्वयाने पार पाडावी, अशी सूचना 18-जालना लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) राजेश कुमार यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवनात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत राजेश कुमार बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजशेकरा एन., निवडणूक निरीक्षक (खर्च) सरवणाकुमार के., जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. राजेश कुमार म्हणाले की, प्रशासनाने लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पुर्वतयारीची प्रत्यक्षात योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. संवेदनशील मतदान केंद्रांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच दूरस्थसह इतर सर्व मतदान केंद्रांची देखील तपासणी करावी. ज्या ठिकाणी त्रुटी आहेत त्याचे तात्काळ निराकरण करावे. निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. यात ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प, व्हिलचेअर, मतदारांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी शेड व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष, प्रसाधनगृह, आदीं सुविधा सहायक निवडणूक अधिकारी यांनी आपल्या मतदारसंघात आहेत का, याची खात्री करुन घ्यावी. निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी योगदान द्यावयाचे आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही श्री. राजेश कुमार यांनी यावेळी दिल्या.

निवडणूक निरीक्षक (पोलीस) ) राजशेकरा एन म्हणाले की, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने जे नियोजन केले आहे, त्याची योग्य अंमलबजावणी करावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल यासाठी दक्षता घ्यावी.  निवडणूक निरीक्षक (खर्च) सरवणाकुमार के. यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने खर्चाच्या सर्व नोंदी अद्यावत ठेवण्याची सूचना केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेले पोलीस बंदोबस्ताचे नियोजन व कारवायांबाबत माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी मतदार केद्रांवर मतदारांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधा आणि मतदानासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व सहायक निवडणुक अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे