– शाडू च्या माती पासून गणपती बनविणे या उपक्रमामध्ये कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी झाले साक्षीदार!
(जालन्याच्या या उपक्रमाची गिनीज बुक मध्ये होऊ शकते नोंद)

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
दिव्य मराठी अद्वित व जिल्हा प्रशासन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शाडू च्या मातीपासून गणपती बनवणे हा उपक्रम मोठ्या संख्येच्या प्रमाणात आज राबवण्यात आला.यामध्ये शाडूच्या माती पासून गणपती बनवणे हा उपक्रम जवळपास सात हजार विद्यार्थ्यांनी अनुभवला यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल मॅडम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना संदेशात्मक बोधात्मक संबोधित केले. यावेळी मनपाच्या आयुक्त अंजली शर्मा तसेच जालना जिल्ह्याचे भूषण उद्योगपती सुनील भाई रायठठा सर तसेच जालना फर्स्ट चे सर्व पदाधिकारी रोटरी क्लब लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी स्काऊट अँड गाईड सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी 100 शिक्षक क्लब ऑफ जालनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दिव्य जालना जिल्ह्याचे सीईओ )जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कै.जालना जिल्हा परिषदेचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. कृष्ण कांत कनवारिया (भा.प्र.से.) तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक संगीता भागवत मॅडम व माध्यमिकचे बाळासाहेब खरात सर, गटशिक्षणाधिकारी , गजानन वाळके सर, वानखेडे सर, रवी जोशी सर, स्काऊट संघटक मिलिंद तायडे सर, आप्पासाहेब मुळे सर, पवन जोशी सर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिनाक्षी कुलकर्णी मॅडम यांनी कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गणपती बनवत असतांना चर्चा करून शुभेच्छा दिल्या.

