समरसता लोकसंमेलनास लोककलावंतांनी हजर रहावे

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22
शासनाच्या वतीने समरसता लोककलावंत संमेलन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे या ठिकाणी होत असून, महाराष्ट्रातील लोककलावंतांना ही एक पर्वणी आहे. महाराष्ट्रातून अनेक लोककलावंतानी या संमेलनास हजर रहावे, असे आवाहन जालना जिल्हा समन्वयक शाहीर नानाभाऊ परिहार व शाहीर रंगनाथ बिडवे यांनी केले आहे. लोककलावंतांसाठी हे महाराष्ट्रात शासकीय पहिले साहित्य संमेलन असून, पद्मश्री रघुवीर दादा शाहीर नानाभाऊ परिहार खेडकर यांची संमेलन यांचे आवाहन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या संमेलनासाठी विशेष समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नातून हे संमेलन घडून आले आहे. तयामुळे संमेलनासाठी महाराष्ट्रातून अनेक लोककलावंतानी या संमेलनास हजर रहावे, असे आवाहन जालना जिल्हा समन्वयक शाहीर नानाभाऊ परिहार व शाहीर रंगनाथ बिडवे यांनी केले आहे.



