उरण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला पिरवाडी किनारा पुन्हा एकदा एका थरारक घटनेमुळे चर्चेत आला आहे. सोमवारी संध्याकाळी समुद्रात फिरायला गेलेले पाच पर्यटक भरतीमुळे खडकांमध्ये अडकले होते. मात्र, सागर सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या पाचही जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
सोमवारी संध्याकाळी काही पर्यटक उत्साहाच्या भरात किनाऱ्यापासून लांब असलेल्या खडकांवर गेले होते. यावेळी समुद्राला भरती आल्याने पाण्याचा वेढा वाढला आणि हे पर्यटक मध्येच अडकून पडले. जीवाची भीती निर्माण झाल्याने पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या सागर सुरक्षा रक्षकांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने धाव घेतली आणि पाचही पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
पिरवाडी किनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे खाण्यापिण्याची आणि मनोरंजनाची उत्तम सोय असली, तरी प्रशासकीय उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. किनाऱ्यावर कुठेही धोक्याच्या सूचना देणारे फलक नसल्याने नवीन येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा आणि खडकांचा अंदाज येत नाही. अनेकदा उत्साहाच्या भरात पर्यटक खोल पाण्यात किंवा खडकांवर जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात.
पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांना योग्य दिशा मिळावी आणि असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठिकठिकाणी माहिती फलक आणि इशारा देणारे बोर्ड लावावेत, अशी मागणी स्थानिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे. सोमवारी झालेल्या या घटनेत केवळ सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ. साळवे, डॉ. मोठे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
7 hours ago
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन 29 जुलै रोजी जालन्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धा; युवकांना सहभागाचे आवाहन
7 hours ago
शालेय बस-व्हॅनसाठी नवे नियम लागू; सुरक्षा उपाय अनिवार्य 23 ते 30 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
7 hours ago
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात आयव्हीबीपी संस्थेकडून 1 कोटी लसींचे वितरण
7 hours ago
सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व विद्यार्थी जीवनातच घडते- प्राचार्य डॉ ठक्कर.
7 hours ago
मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत आढळला अनोळखी बेवारस इसमांचे मृतदेह.
7 hours ago
खोपटे येथे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रम संपन्न.
7 hours ago
जंतर मंतर दिल्ली येथिल विद्यार्थ्यावरील अमानुष लाठीमार विरोधात उरण मधे निदर्शने.
7 hours ago
श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण
7 hours ago
जाफ्राबाद शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेबुब खान पठाण