pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णीच्या शंकर मुळेंकडून चिमण्यांसाठी दाणापाण्याची सोय, पक्षी मित्र म्हणून नावलौकिक

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.12

टेंभुर्णी येथील कोमल जनरल स्टोअरबाहेर दररोज शेकडो चिमण्यांचा किलबिलाट; उन्हाळ्याच्या झळांपासून पक्ष्यांना दिलासा उन्हाळ्याचा कडाका वाढला असून रस्ते तापले आहेत. पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने माणसांसह पक्ष्यांचेही हाल होत आहेत. अशा परिस्थितीत टेंभुर्णीतील कोमल जनरल स्टोअरचे मालक शंकर मुळे यांनी दुकानाबाहेर चिमण्यांसाठी दाणापाण्याची सोय करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. वाढत्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात पक्ष्यांना निवारा मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन मुळे यांनी आपल्या दुकानाच्या शटरजवळ सावलीत मातीची परात आणि दाण्याची ताटली ठेवली आहे. सुरुवातीला चार-पाच चिमण्या येथे येत होत्या. मात्र, आता दररोज शेकडो चिमण्या पाण्यासाठी आणि दाणे टिपण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत. या उपक्रमामुळे बसस्थानकाजवळील चौकट :- चिवचिवाट म्हणजे सकाळची प्रार्थना “चिमण्या चिवचिव करतात तेव्हा प्रत्यक्ष देवच बोलत असल्यासारखे वाटते. एक आई पिलाला घास भरवते, दुसरी पाण्यात डुबकी मारते, हे दृश्य पाहून खूप समाधान मिळते. कडक उन्हात दुकानात काम करताना येणारा ताण या चिमण्या पाहिल्या की निघून जातो.” -शंकर मुळे, व्यावसायिक हे दुकान आता परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक ग्राहक मुद्दाम दुकानावर थांबतात. त्यामुळे हे पक्षीमित्र बनण्यासाठी प्लॅस्टिक किंवा स्टीलऐवजी मातीच्या भांड्याचा वापर करावा, जेणेकरून पाणी थंड राहते. पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवलेले पाणी दिवसातून दोन वेळा बदलावे. घाण पाणी पक्षी पीत नाहीत. 3 पक्ष्यांना मीठ किंवा तिखट नसलेले गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदळाचे तुकडे खाण्यास द्यावेत. पाण्याचे भांडे उन्हात तापणार नाही याची काळजी घेत ते नेहमी सावलीत ठेवावे. ठिकाण आता पक्षीमित्र कट्टा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे, असे विश्वनाथ सांगोळे यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे