“मानव सेवा हीच ईश्वर सेवा”—- संतोष आवटी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3
मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ (किंवा मानव सेवा हीच माधव सेवा / जीव सेवा ही शिव सेवा) हा विचार प्रामुख्याने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी जोडला जातो.महत्त्वाची माहितीप्रेरणा: स्वामी विवेकानंद यांनी मानवाच्या आणि दीन-दुबळ्यांच्या सेवेलाच खरी ईश्वरी पूजा मानले आहे.अर्थ: माणसातील देव ओळखून निस्वार्थपणे केलेली मदत म्हणजेच खरी ईश्वरी भक्ती होय.स्वामी विवेकानंद ने कहा था— “जीव सेवा ही शिव सेवा है आपला देश म्हणजे ,भारत देश ,या देशाला भारत माता या नावाने आपण जयघोष करत असतो, म्हणजे मला सांगायचे आहे की ही माता आपल्या मुलाबाळांना चांगल्या पद्धतीने सांभाळते का? कारण या ठिकाणी बरीचशी गरीब मुले आहे आज त्यांना काही आजार एवढा गंभीर झालेलाअसतो की त्या आजारासाठी त्यांच्याकडे एवढे पैसे नाही उदाहरणार्थ आत्ता घडलेल्या हृदय नावाच्या बाळाला दहा कोटी रुपयांची गरज भासते म्हणजे त्या बाळाचा आजार एवढा गंभीर आहे की त्याचे इंजेक्शन दहा कोटी रुपयांच्या पुढे आहे एवढे महागडे इंजेक्शन ती माता विकत घेऊ शकत नाही आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन त्या बाळाच्या इंजेक्शन साठी सगळ्यांनी हातभार लावले व त्या बाळासाठी सगळ्यांनी आज मदत केली म्हणजे आपल्या भारतात मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मी या ठिकाणी मांडतो आहे, त्यासाठी शासन दरबारी बरीचशी मंडळी काम करतात त्यामध्ये नेतेमंडळी असू द्या बरेचसे सरकारी मंडळी असू द्या यांनी सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी माता-भगिनींसाठी असे काही हॉस्पिटल निर्माण करावे जेणेकरून विदेशातून आपल्याला इंजेक्शन मागवण्याची गरज भासणार नाही व वैद्यकीय क्षेत्रात नवीन मुलं मुली जे डॉक्टर होत आहेत त्यांच्यासमोर असे आवाहन द्यावे की आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक आजारावर औषधी उपलब्ध व्हायला हवी. जेणेकरून आपला भारत देश कोणत्याही देशाकडे इंजेक्शन साठी मागणी करायची गरज पडणार नाही , आज वैद्यकीय क्षेत्रात नीट च्या परीक्षेमध्ये बरेचसे घोटाळे समोर येत आहे की जेणेकरून हुशार विद्यार्थी मागे राहतात आणि श्रीमंत विद्यार्थी पैशाच्या जोरावर पुढे जात आहेत म्हणजे या ठिकाणी जे होणारे डॉक्टर आहे ते उद्या आपल्यालाच मारतील यावर शासनाने विचार केला पाहिजे, आरोग्याचा खेळ होणार आहे,
।मानवता आणि दीनदुबळ्यांची सेवा: इथे गाडगेबाबांनी सुद्धा सांगितले आहे की भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, निवाऱ्याशिवाय असलेल्यांना आसरा आणि अज्ञानाला दूर करणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे, असे त्यांचे मत होते
अजून त्यामध्ये दुसरे उदाहरण द्यायचे म्हणजे. पद्मश्री सिंधुताई सपकाळ या ‘अनाथांची माय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महान भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हजारो अनाथ व निराधार मुलांच्या संगोपनासाठी समर्पित केले.सिंधुताईंचे प्रमुख सामाजिक कार्यअनाथांचे संगोपन: सिंधुताईंनी आपल्या आयुष्यात १५०० हून अधिक अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.संस्थांची स्थापना: त्यांनी पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण येथे १९९४ मध्ये ममता बाल सदन ची स्थापना केली. याशिवाय चिखलदरा येथेही वसतिगृह सुरू केले.संस्थेचे उपक्रम: त्यांच्या पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ संस्थेअंतर्गत श्री मनशांती छात्रालय, बालगृह, माईनगरी, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह आणि गोपिका गाय संरक्षण केंद्र चालवले जातात.इतर संघर्ष: केवळ मुलेच नव्हे, तर जंगलातील विस्थापित आदिवासींच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शासनदरबारी लढा दिला.
अजून गरिबांसाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता भारतरत्न”मदर तेरेसा “यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा या विचाराला धरून या एक महान कार्य केले आहे,मानवतावादी, समाजसेविका आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या रोमन कॅथॉलिक नन होत्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब, अनाथ, आणि आजारी लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले.जीवन परिचयमूळ नाव: अँजेझ गोंजा बोयाजिजू (Anjezë Gonxhe Bojaxhiu)जन्म: २६ ऑगस्ट १९१०, स्कोप्जे (सध्याचे उत्तर मॅसेडोनिया).कर्मभूमी: भारत (विशेषतः कोलकाता).मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७, कोलकाता.कार्य आणि उपलब्धीभारतात आगमन: मदर तेरेसा १९२९ मध्ये भारतात आल्या. त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले होते.मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना: त्यांनी १९५० मध्ये कोलकाता येथे ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ (Missionaries of Charity) या संस्थेची स्थापना केली.समाजसेवा: याद्वारे त्यांनी हजारो कुष्ठरोगी, अनाथ मुले आणि गरिबांना आश्रय व वैद्यकीय मदत दिली.नोबेल पुरस्कार: मानवतावादी कार्यासाठी त्यांना १९७९ मध्ये प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.भारतरत्न: त्यांना १९८० मध्ये भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. हीच ईश्वर सेवा”


