विठुरायाला शेतकऱ्यांचे पाण्यासाठी साकडे,टेंभुर्णी सह भागात दुबार पेरणीचे संकट. कोवळ्या पिकांनी टाकल्या माना.
वरुण राजा तूम्ही आमची अडचण जाणा. शेतकरी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19
या वर्षी मक्काची पेरणी कमी झालेली दिसत असून मुंग उडीद फक्त औषधांचे दिसत असून या वर्षी सोयाबीन आणि कापशी तूर यांची पेरणी चांगली झालेली असून मागील आठ दिवसा आधी झालेल्या चांगल्या पाऊसाने पेरणी चांगली झाली असून उशिरा का होइना सगळी कडे पेरणी पूर्ण झाल्याचे चित्र आहे. आता मात्र बरेच दिवस झाले असून आता शेतकरी यांचे डोके सारखे आभाळा कडे लागले असून किमान एक चांगला पाऊस पडण्याची त्यांची आशा वाढली आहे. आपल्या कडील बी बियाणे खत औषधी मारून पेरणी पूर्ण करून आता मात्र त्याची वरुण राजा ला सारखी मागणी सुरू झाली असून उभ्या पिकांनी माना खाली टाकण्यास सुरवात झाली असून किमान एका चांगल्या दणदणीत पाऊसाची प्रतिक्षा मात्र आता लागली आहे. सध्या कुठेच पाणी साचलेले नसून विहिरी अजून ही खालच्या तळ्याचे चित्र दिसत आहे. एका जोरदार पाऊस ने जर विहिरीला पाणी आले तर पुढे काही तरी फायदा होईल असे असून अजून पाणी चा सगळा प्रश्न गंभीर बनत चालला असून आता फक्त देवावर विश्वास असल्याची भावना शेतकरी यांनी बोलवून दाखविली आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने आपल्या कडील जमा पूंजी ही त्यांनी शेतात टाकली असून अजून दुबार पेरणी किंवा पीक वाया जाईल या भीतीने त्यांची चिंता पुन्हा वाढली असून आता किमान जास्त नाही तर थोडा पाऊस जरी आला तर आमची पिके वाचतील अशी आशा त्यांनी पांडुरंगी चरणी केली आहे.




