जालना शहर महानगरपालिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ जयंतीनिमित्त ११,१९९ लाडुचे वाटप करून साजरी करण्यात आली.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. जालना शहर महापालिकेच्या परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुर्णाकृती पुतळा येथे महाप्रसाद लाडुचे वाटप करून, जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्याचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करुन उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रवेशव्दार माळीपुरा येथे करणार असल्याची ग्वाही उपमहापौर राजेश राऊत यांनी दिली.
यावेळी जालना शहर महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, उपायुक्त नंदाताई गायकवाड, भन्तेजी शिवली शाक्यपुत्र थेरो, राहुल देशमुख, उपसभापती अॅड. भगवान चांदोडे, स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल, कल्याणीताई तौर, मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, उपाध्यक्ष सुरेश रत्नपारखे, सुनिल रत्नपारखे, निखील पगारे, जालना महानगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर, अॅड. अर्शद बागवान, अॅड. संजय सोनटक्के, अॅड.बी.एम. कुलकर्णी, मनोज धानुरे, विशाल धानुरे, गोकुळ स्वामी, दिनकर घेवंदे, अॅड. रामेश्वर खांडेभराड, भास्कर घेवंदे, आसाराम रायकर, राहुल रायकर, रमेश गडकरी, वैजिनाथ नागरे, श्रीमती मोरे, नितीन तायडे, दौलत खंदारे, कडुबा वाकेकर, पांडुरंग चांदोडे, गणेश जाधव, महेंद्र शिंदे, अमरदिप शिंदे, अमोल धानुरे, दशरथ तोडुळे, शिवकुमार राऊत, स्वप्निल गायकवाड, रंजित अरूण मगरे, संजय वाघमारे, आनंद वाघमारे, शिवलाल गाडगे, हरिष रत्नपारखे, शंकर तारो, गंगुबाई वानखेडे, कांताबाई रत्नपारखे, छायाबाई बनकर, भाग्यश्री पगारे, रंजना सिरसाठ, सरूबाई मगरे, श्रीमती नावकर, कोमल शिंदे, अम्रपाली बोरुडे, मंगला खांडेभराड, मंजु घायाळ, ऋतुजा खरात, शेख फिरोज, राहुल करनाडे, विजय भगत आदिंची उपस्थिती होती. सुत्रसंचलन बाबासाहेब वानखेडे यांनी केले. तर आभार गोकुळ स्वामी यांनी मानले.