श्री संत शिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, सेक्टर १४, कोपरखैरणे नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, सेक्टर १४, कोपरखैरणे नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच जन्म दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती चौक, वाशी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला ओबीसी नेते राजाराम पाटील, रामदास नामदेव डोके (आरएनडी ) आणि देवकी शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी वाजत-गाजत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक एका भव्य रथातुन निघाली. मिरवणुकीमध्ये अनेक वाहने सामील झाले होते.
मिरवणुक डी-मार्ट चौकातून पुढे महालक्ष्मी मंदिरा शेजारी पोहचली सेक्टर- १४ कोपरखैरणे येथे सभेची व्यवस्था केली होती. सभा स्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती सावित्री माता आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला राजाराम पाटील (ओबीसी नेते ), रामदास नामदेव डोके (आरएनडी ), सुरेश जाधव (एसीपी), प्रा. वंदना महाजन (मुंबई विद्यापीठ), डी. के. माळी यांनी हार अर्पण केले. दिप प्रज्वलन करून सभेस सुरुवात झाली. प्रास्ताविक झाल्यानंतर मान्यवरांनी सावित्री माईच्या जिवनावर भाषणे केली.राजाराम पाटील (ओबीसी नेते), रामदास नामदेव डोके (आरएनडी ), सुरेश जाधव (एसीपी ). डी. के. माळी, डॉ. वंदना महाजन (मुंबई विद्यापीठ) मराठी विभाग, किरण झोडगे समता परिषद यांची समाज प्रबोधनपर भाषणे झाले. आजच्या आधुनिक युगात सावित्रीबाई यांचे विचार किती मोलाचे आहेत हे सर्व जणांनी सांगितले.राजाराम पाटील यांनी शुद्र आणि अति शुद्र यांना आजही कसा त्रास होतो. आणि कसा अन्याय करायचे प्रयत्न केले जातात हे विषद केले.यावेळी सायली नारायण शिंदे नगरसेविका,निर्मलाताई कचरे नगरसेविका, शोभाताई दिपक पाटील, देवकी शिंदे – (राष्ट्रवादी),भारतीताई पाटील, शारदा नामदेव डोके आदी मान्यवर उपस्थित होते.